Thursday, February 16, 2012

कुरुक्षेत्र...

अगणित झाले वार जरी, छातीवरी झेलायचे,
ऊठ पुन्हा पेटून गड्या, तुज उत्तर आहे द्यायचे.

प्रेमगीते, भावगीते तुजसाठी बनलीच नाही,
तुजसदा त्वेषाने हे समरगीतच गायचे.

जीवनाच्या कुरुक्षेत्री, भावनांना स्थान नाही,
आप्तांवरती बाण रोखून, तुज अर्जुन आहे व्हायचे.

पाप-पुण्याचा हिशोब, कर येथेच चुकता,
तुज तुझे गाऱ्हाणे ना दैवादारी न्यायचे.

शपथ तुला लखलखणाऱ्या तलवारीच्या पात्याची,
हरलास ही लढाई जरी, तुज युद्ध आहे जिंकायचे.

1 comment: